Sunday, August 22, 2021

अभंग : अवघा तो शकुन । वर चिंतन
Post on 22/08/2021 
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com 

For English Readers a separate post has been added.

              संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर निरूपण

अभंग :-

अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चिंतन ।

येथे नसतो वियोग । लाभा उणे काय मग ।

छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा |

तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥

शब्दार्थ :- हृदयी देवाचे चिंतन करणे याखेरीज दुसरा कोणताच शकून मानू नये. येथे देव व भक्तामधे  द्वैत  नसते वेगळेपण नसते. अशा हरिभक्ताची वाणी नेहमीच शुभ असते. ज्याला हरिनामाचा छंद लागला आहे अशा हरिभक्तासाठी सर्व काळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात.

अभंगाचा भावार्थ :- ह्या अभंगाच्या भावार्थाचे दोन भाग आहेत.

१)      पहिल्या भावार्थाप्रमाणे येथे ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी हरीभक्ताचे दर्शन झाले तर कोणता फायदा होतो हे सांगितले आहे. सतसंगतीचे महत्वच येथे सांगितलेले आहे.

२)      तसेच दुसरा भावार्थ मुमुक्षू साधकासाठी उपयोगी आहे.

भावार्थाचा भाग १ ला :- जेंव्हा एखादा भक्त हरीनामस्मरणात दंग होतो तेंव्हा त्याच्या मनामधे हरीचे नाम मनामधे येते व त्यावेळी  त्याच्या  डोळ्यांसमोर भगवंताची मूर्ती उभी राहते व मन भगवंताशी क्षणभर तरी ऐक्य पावते. अशा प्रमाणे नाम घेतल्याक्षणीच भक्त व भगवंत यांच्या मधे ऐक्य झालेले असते.

अशा भक्ताकडून जेंव्हा नामस्मरण सतत होत असते अर्थात तेंव्हा त्यांच्या मनामध्ये भगवंताचेच चिंतन सुरू असते. मग तो शरीराने काहीही कार्य करत असला तरी हे चिंतन मनामधे सतत होत असल्यामुळे भगवंत व भक्ताचे ऐक्य कधीच भंग होत नाही म्हणुनच अशा भक्ताचे दर्शन हाच सर्वात मोठा शुभशकून होय, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

नारदांना भगवंत सांगतात की “ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्‌भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥   म्हणजेच जेथे माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी मला स्मरतात तेथे मी उभा असतो; असे भगवंतांनी नारदमुनींना सांगितले आहे.

म्हणूनच आपल्याकडे जेथे हरिभजन, कीर्तन चालू असते त्याठिकाणी भगवंताचा वास असतो हा समज आहे व तो योग्यच आहे. जेंव्हा आपण सत्संगात असतो तेंव्हा आपण भगवंताच्या सहवासातच असतो. म्हणूनच सत्संग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. जे कोणी अशा सत्संगात असतात त्यांचे मन त्यामुळे शुद्ध  होते व अशा स्वच्छ मनाच्या आरशातच भगवंत प्रगट होतो. ह्याप्रमाणे ह्या अभंगाचा अर्थ आपण घेऊ शकतो.

तुकाराम महाराज म्हणूनच अभंगात म्हणतात की अशा सत्संगाची वेळ व स्थान कोणतेही असले तरी असा सत्संग मिळणे हा शुभशकूनच आहे. अर्थातच अशा सत्संगासाठी  कोणत्याही दिवसामधील  कोणतीही वेळ योग्यच असते. आपल्याकडे अनेक लोक राहूकाळ हा चांगले काम सुरू करण्यासाठी योग्य व शुभ मानत नाहीत पण जर अशा राहूकाळात सुद्धा जर एखाद्या ठिकाणी सत्संग  चालू असेल व आपल्याला तेथे जाण्याची ईच्छा मनात आलेली असेल तर ती वेळ हा तो शुभकाळच आहे असे  महाराजांनी म्हटले आहे.

अशा सत्संगाचे महत्व सांगताना भजगोविंदम्‌ स्तोत्रामधे श्रीमद्‍ शंकराचार्य म्हणतात

सत्संगत्वे नि:संगत्वं , नि:संगत्वे निर्मोहत्वम्‌ । निर्मोहत्वे निश्चलत्वं, निश्चल्तत्वे जीव्न मुक्ति:॥

ह्या वचनाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे.

अर्थ :- संतांच्या सहवासात राहिल्याने भक्त शेवटी संगविहीन होतो. त्याचे सर्व भ्रम , व्यर्थ विचार, चुकीच्या समजुती , दृश्यातल्या वस्तुंविषयी च्या अभिलाषा, भोगांच्य़ा इच्छा ह्या सर्वांपासून तो वेगळा होतो. त्याच्यावर ह्या सर्वाचा परिणाम होत नाही. मन  स्वतंत्र वासनारहित होते. ते भगवंतावर स्थिर होते. निश्चल तत्वावर स्थिर होते.व ह्यामुळे भक्ताला देहामधे असतानाच मुक्ती मिळते.

जे शंकराचार्यांनी सांगितले तेच तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात वेगळ्या शब्दांमधे सांगून  जीवन्मुक्तीसाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग पण सांगितलेला आहे. कारण नामस्मरणाने आपण सतत भगवंताच्या सत्संगातच राहतो.

येथे शिकवण मिळते की “ सत्संगाला जरूर जाणे हे केंव्हाही योग्य असते  व सत्संगास जाणे माणसाने टाळू नये.”

भावार्थ २ रा :- अनेक संतांनी नामस्मरण करण्याचा उपदेश केलेला आहे. हा अभंग सुद्धा जो मुमुक्षू साधक असेल त्याला नामस्मरण करण्याचाच उपदेश करणारा आहे.

ह्या अभंगामधे संत तुकाराम महाराजांनी नामस्मरण कसे नेहमी सुरू ठेवावे हेच जणूकांही सांगितलेले आहे. तुकाराम महाराज अभंगामधे म्हणताहेत की :-

जेंव्हा आपण   भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “  ह्या मुद्द्यावर्  मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या  कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने  आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले  प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती.  ह्या चिंतनामुळे मनामधे   भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग  त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात  शेवटी  नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्‍भक्ती करू लागतो.

ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच  चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .

भक्तीच्या ह्या अवस्थेलाच “ तीव्र मुमुक्षुत्वाची अवस्था “  म्हणतात.

नामस्मरणाबद्दल् आपली शास्त्रे असे सांगतात की  कोणत्याही वस्तूचे नांव मनामधे आठवले  की त्यावस्तूची प्रतिमा मनामधे त्याच क्षणी निर्माण होते. मन त्या प्रतिमेशी एकरूप होते.

म्हणूनच् जर सतत भगवंताचे नाम घेतले गेले तेवढा वेळ मन भगवंतमयच होते. भगवंत हा आनंदरूप, प्रेमरूप, आहे. आपले मनपण तसेच बनते. आपल्या  मनाची शुद्धी होते. मनाच्या ह्या स्वच्छ आरशातच  भगवंत येतो.

 अशी स्थिती असलेल्या भक्ता द्वारे जे कांही बोलणे होते ते खरेतर त्याच्या कडून भगवंतच बोलवून घेत   असतो.  ह्यालाच तुकाराम महाराजांनी अभंगामधे “  शुद्ध वाचा होणे “ असे  म्हटले आहे. तसेच जो भक्त तीव्र मुमुक्षूत्वाच्या अवस्थेला पोहोचतो त्याला भगवंताशिवाय दुसरे कांहीही सुचत नसते. ह्यालाच निदिध्यास लागणे असेपण म्हणतात. असा निदिध्यास लागला की भक्ताकडून  चिकाटीने व मुख्यत: भगवद्‌प्रेमाने नामस्मरण घडते. ह्या सतत केलेल्या नामस्मरणामुळेच; आधी वर्णन केल्याप्रमाणे भक्त व भगवंत यांच्यामधे ऐक्य घडते.

 तुकाराम महाराजांनी म्हणूनच अभंगात म्हटले आहे की  “ भगवंताचा वियोग होत नाही.”  अशा भक्ताची वृत्ती  दास्यभावाची होते. त्याची भक्ती दास्यभक्तीमधे बदलते व तो हरीदास म्हणजेच भगवंताचा दास होतो. अर्थात ह्यात त्याला आनंदच मिळत असतो.

आपल्याकडे एखादे  कार्य सुरू करण्याच्या आधी जर कांही विशिष्ठ घटना घडल्या तर त्यांना शुभशकून म्हणतात. असे शकून झाले तर कार्य नक्की सिद्ध होते. ह्या कल्पनेचाच दृष्टांत अभंगात घेऊन संत तुकाराम म्हणताहेत  की अशा भक्ताचे दर्शन होणे हाच मोठा शकुन असतो. मग असा भक्त म्हणजेच हरीदास , कोणत्याही दिशेला दिसला तरी त्याच्यासाठी सर्वकाळ सर्व दिशा कल्याणकारकच असतात.

मुमुक्षूंसाठी अभंगाची शिकवण हीच आहे की नामस्मरणाच्या सहाय्यने भगवंताला दृढ धरून ठेवावे व जीवीताचे सार्थक करून घ्यावे.

                                                           


Tuesday, September 24, 2019

 स्वर्गातून पाठवलेल्यातील ४था अभंग :-24/09/2019date 
 Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com



Date :- 24th Sept 2019
स्वर्गातून पाठवलेल्यातील ४था अभंग :-
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन।भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥

शब्दार्थ :-
जशी गंगा नदी वाहत असते तसे त्याचे मन असते. त्याच्याजवळ भगवंत आहे हे ह्या खुणेवरून समजावे. ॥१ ॥ देव त्याच्यापाशी त्याच्या भक्तीभावामुळे उभाच आहे व अशा भक्ताला स्वानंदाचा गाभा असा भगवंतच प्रत्यक्ष दिसतो॥२ ॥ त्याला भगवंताचे अंगुष्ठमात्र असणारे रूप दिसते , ज्याला हा अनुभव आहे त्यालाच ही खूण समजेल ॥३॥ ही खूण ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव मिळाला आहे तेच समजतात. तुका म्हणतो की ही पदवी म्हणजे स्थिती ज्याची ( पात्रता आहे) त्यालाच लाभते. ॥४ ॥

अभंगाचा सखोल अर्थ स्पष्ट होण्यासाठी लागणारी माहिती.

) महाराजांनी आपल्याला पहिल्या अभंगात जन्माची कारणे तसेच दु:ख भोगावे कां लागते हे सांगून ह्यातून सुटके साठी परमार्थ साधन करावे हे सांगितले आहे.

) त्यानंतर चित्तशुद्धीचे महत्व सांगणारा अभग दुसरा आहे. त्यामधे ब्रह्मज्ञानी सदगुरुंना शरण जावे हा उपदेश महाराजाम्नी केला आहे.
) आता ह्या तिसऱ्या अभगामधे; तुकाराम महाराज आपल्याला तीन मुद्दे सांगताहेत ) अशा चित्तशुद्धीमुळे काय होते?
) चित्तशुद्धी व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करावे? किती वेळ करावे?
) भवंताशी ऐक्य कोणाला लाभते. अर्थात मुक्ती कोणाला मिळते?

सर्वप्रथम मुक्ती मिळते म्हणजे काय ते थोडक्यात पाहून आपण अभंगाकडे वळणे उचित होईल.

भक्तीचे सर्वोत्तम फळ म्हणजे भगवंताची भेट होणे. भेट होणे ह्याचा अर्थ भकत व भगवंताचे ऐक्य होणे ह्याअर्थाने आपण येथे घ्यायला हवा. भ्गवंत अमर्याद आहे , अजन्मा आहे व मृत्यातीत अर्थातच आहे. तो सत्‌ चित्‌ आनंदमय आहे. जेंव्हा भक्ताचे भगवंताशी ऐक्य घडते तेंव्हा तो पण जन्म मृत्यातीत सच्चिदानंदस्वरूपच होते.

येथे एक शंका येईल की असे खरेच होत असेल कां? पण जर आपण कोणत्याही संत पुरूषाचे चरीत्र पाहीले तर असे आढळते की संत असेच होते. त्यामुळे ते जरी शरीरत्याग करून गेले तरी त्यांच्या भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत असतात. योगी अरविंदांना विवेकानंदांनी अरबिंदो तुरुंगात असताना मार्गदर्शन केले असे एक उदाहरण मला येथे आठवते. निर्याणानंतर कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिले व त्यांच्या मनाचे समाधान केले ही कथा पण जगप्रसिद्ध आहे.

जोवर भक्त व भगवंत वेगळे असताता तोवर अशा भक्तावर मायेचा प्रभाव ह्या वेगळे असण्यामुळेच होत असतो. ह्या मायेच्या प्रभावामुळे अशा भक्ताच्या मनामधे दु:, करूणा, अशा ह्या भावांचा पण आविष्कार होतो.

पण जेंव्हा आत्मज्ञान होते व भक्त भगवंताचे ऐक्य घडते व मोक्षप्राप्ती होते.

हेच खरेतर प्रत्येक जीवात्म्याचे मूल ध्येय असते. पण जन्म होताक्षणीच मायेच्या प्रभावाखाली येऊन तो ते विसरतो. पुढे पूर्वसुकृतानुसार मुमुक्षुत्व निर्माण होते व भक्त आपल्या ध्येयप्रप्प्तीसाठी प्रयत्न करू लागतो. शेवटी जेंव्हा ध्येय प्राप्ती होते भक्त भगवंताचे ऐक्य होऊन भक्त ब्रह्मरूप होतो
.
श्रीमद्‍ भगवद‌गीतेमधे स्थितप्रज्ञाची लक्षणे अर्जूनाने विचारली त्याचीच येथे आपल्याला आठवण होते.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-
) अभंगाच्या पहिल्याच चरणात महाराज म्हणतात की " जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १॥
ह्या पहिल्याच चरणामधे तुकाराम महाराजांनी वाहत्या गंगेचे उदाहरण दिलेले आहे.
( टीप:- गंगा वाहती आहे हे उदाहरण तुकाराम महाराजांनी कां दिले आहे ? ह्याचा मला कांहीकेल्या उलगडा होत नव्हता. पण अशा वेळी सद्‍गुरूच मार्ग दाखवतात हेच खरे. मी दि. १७ ऑगस्ट्ला सत्संगाला गेलो होतो व सद्‌गुरुंच्याच " मुन्नेरू म्हणजे तामिळमधे पुढे चला -चालत रहा " ह्या पुस्तकातल्या पहिल्याच ह्याच नावाच्या प्रवचनावर सत्संग प्रवचन होते व त्यात वरील चरणाचा अर्थ स्पष्ट झाला तोच आता लिहित आहे.)

आपल्याकडे सर्व नद्यां पवित्रच मानतात. त्यांच्यामधे गंगानदीला सर्वोत्तम स्थान आहे. गंगेमधे जो कांही ओहोळ , ओढा , लहान मोठी नदी, नाला कोणतेही पाणी असो ; एकदा कां ते गंगेला मिळाले की ते गंगाच होते. गंगा आपल्यामधे सर्व सामावून घेत व तरीही पवित्रच राहते. तॊ समुद्राकडे वाहत असते व शेवटी समुद्राला जाऊन मिळते. येथे समुद्र म्हणजे भगवंत असा अर्थ घेतला तर योग्य ठरते.

स्वामी विवेकानंदांच्या शिकागोच्या पहिल्याच भाषणामुळे प्रसिद्ध झालेले एक वाक्य आहे .ते म्हणजे " आकाशात्‌ पतितं तोयं , यथा गच्छति सागरात्‌ ; सर्व देव नमस्कारान केशवं प्रति गच्छति " अर्थात जसे आकाशातून पडलेले पाणी शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते , तसेच सर्व देवांना केलेले नमस्कार शेवटी एका केशवालाच पोहोचतो. पाणी सर्वप्रथम ओहोळ स्वरूपातच असते. ते गंगेस मिळाले की शुद्ध होते तद्वतच प्रत्येक भक्ताचे मन त्याच्या भगवदभक्तीप्रेमामुळे मनाने हळुहळु शुद्ध होत असतो.
पाणी जर वाहते नसेल तर ते अशुद्ध होते , म्हणून पाणी वाहतेच हवे. अर्थात जरी मन जरी शुद्ध झाले आहे असे वाटले तरी साधना भक्तीभावाने ही चालूच ठेवायला /रहायला हवी. वाहणारी गंगाच शेवटी समुद्राला मिळू शकते तसेच सतत न कंटाळताता केलेली साधनाच शेवटी भक्त व भगवंताचे ऐक्य घडवून आणते.
प्रत्येकाच्या मनशुद्धीच्या पातळिनुसार हे ऐक्य कदाचित एकाच जन्मात साध्य होईल अथवा श्रीमद-भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ६ व्या अध्यायाप्रमाणे पुढच्या जन्मात होईल. जशी गंगा वाहते तसेच भक्ताने आपली साधनाभक्तीभावाने-प्रेमाने करत रहावी. हे येथे स्पष्ट झाले.

अर्थात भकत अजूनही मायेच्या आवरणाखालीच वावरत असल्यामुळे त्याच्या साधनेमधे अनेक अडथळे येत रहातात. त्यातले कांही जे मला सुचले ते पाहूया.

) आपल्या जवळच्या आप्त, मित्राबद्दल काळजी वाटणे.
) पैसा पुरे पडेल कां? हा विचार सतावणे.
) मोठ्या आजारपणांची, म्हातारपणाची काळजी वाटणे.
) जे विषय आवडीचे आहेत पण ज्यांच्या मागे लागल्याने फक्त वेळेचा नास होतो हेव कळले तरी त्यांच्या मागे मनाचे धावणे. ( उदाहरणार्थ जुनी गाणी आवडली म्हणून ती यू ट्यूब पाहण्यात , सिनेमे पाहण्यात वेळ घालवणे.
) लोकांनी आपल्या सांगण्यालाच मान देऊन आपलेच म्हणणे ऐकावे असे वाटणे. व जर कोणी आपल्या सांगाण्याविषयी कांही खुलासा करत असेल तर ते आपल्याला विरोध करत आहेत , मान देत नाहीत असे वाटणे.
) झोपेच्या बाबतीत जागरूक असणे पण भगवंताचे नामस्मरण पूजाकरणे , आपले प्रत्येक कार्य ही भगवंताची पूजा करतो आहे ही भावना ठेवण्या विषयी साठी मात्र तसे जागरूक नसणे.
) संत पुरुषांचे वांङ्मय सोडून ईतर पुस्तके करमणूकीसाठी वाचणे व वेळ वाय घालवणे. .
) वेळेचे नियोजन न करणे व अमूल्यवेळ वाया घालवणॆ.
) स्वत:च्या रागावर नियंत्रण न ठेवणे व कडू बोलणे.
१०) घेतलेली वस्तू वेळीच तिच्या ठरविलेल्या जागी न ठेवणे.
११) अन्नाच्या बाबतीत फार चोखंदळ असणे.
१२) नीटनेटके न राहाणे. व्यायाम न करता फक्त औषधांवर अवलंबून असणे.

हे सर्व अडथळे पार करणे हे जरी कठीण असले तरी जर मृत्यूचे स्मरण असले, तर मात्र ते सहज पार करता येतात. हीच खरी तपस्चर्या होय. अर्थात ह्याच बरोबर आपल्या सद्‌गुरूंना/ भगवंतास संपूर्ण पणे शरण जाणे पण ह्याच बरोबर हवेच. शरणागत भक्ताचे वागणे जागॄत अवस्थेत वर लिहिलेल्या प्रमाणे प्रयत्न करण्याचे असते. व जेंव्हा तो झोपी जातो तेंव्हा भगवंतास सांगूतो की आता मी झोपी जात आहे. आता तूच मला सांभाळ.
असे जो वागत असतो त्याच्याजवळ भगवंत नेहमी उभेच आहेत अस्दे तुकाराम महाराजांनी पहिल्याच चरणामधे सांगितले आहे.

) म्हणूनच अभंगाच्या दुसऱ्या चरणामधे महाराज म्हणतात की "देव त्याच्यापाशी त्याच्या भक्तीभावामुळे उभाच आहे व अशा भक्ताला स्वानंदाचा गाभा असा भगवंतच प्रत्यक्ष दिसतो॥२ ॥" असा शरणागत भक्त भगवंतास अत्यंत प्रिय असतो.
भगवंतानी गीतेमधे असे वचन दिले आहे की अशा भक्तांचा योगक्षेम मीच वाहातो.

हे तुकाराम महाराजांचे स्वानुभवाचे बोल आहेत. त्यांना विठ्ठलाचे दर्शन झालेले होते व ते स्वर्गात त्याच्याकडे गेल्यानंतर पाठविलेल्या अभंगात हा भाग येत आहे.
मी कर्ता नाही तर माझ्या जीवनात जे कांही घडते ते भगवंतच करत आहे. हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. भगवंत हा सच्चिदानंद रूपच आहे. भक्ताला आपले दैवत आपल्याजवळ आहे हा अनुभवच अत्यंत आनंददायी आहे/ असतो. भगवंत जरी अव्यकत असला तरी तो आपल्याजवळ आहे असे अनुभव अनेकांना आलेले माझ्या ऐकण्यात / वाचनात आहेत. असा भकत नेहमीच , कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो.

) अभंगाच्या ३ ऱ्या व ४ थ्या ऱ्या चरणात महाराज म्हणतात " त्याला भगवंताचे अंगुष्ठमात्र असणारे रूप दिसते, ज्याला हा अनुभव आहे त्यालाच ही खूण समजेल ॥३॥ ही खूण ज्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव मिळाला आहे तेच समजतात. तुका म्हणतो की ही पदवी म्हणजे स्थिती ज्याची ( पात्रता आहे) त्यालाच लाभते. ॥४॥

ह्या चरणांचा अर्थ सरळ सोपा आहे . “ अशा भक्ताला भगवंताचे अंगठ्याएवढे रूप दिसते.” येथे महाराज शरीरांतर्गत अंतरात्म्याचे उपनिषदांमधे केलेल्या वर्णनाचा संदर्भ देत आहेत. येथे आपल्या सारख्या सामान्यांना असे रूप दिसत नाही पण मी जे सांगतॊ आहे ते ज्याला असे दर्शन झाले त्यालाच हे समजेल असेही त्यांनी सांगितले आहे. अर्थात असे दर्शन आपल्याला व्हावे ही आकांक्षा मनामधे निर्माण व्हावी हा सुद्धा कदाचित येथे उद्देश असू शकतो.
असे दर्शन होंणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. ते होण्याची पात्रता अंगी असावी लागते. हे पण तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगू हा अभंग पूर्ण केला आहे.

अभंगाची शिकवण :- शिकवण हीच आहे की ज्याला मोक्ष हवा आहे त्याने अभंगाच्या पहिल्या चरणावर विवरण केल्या प्रमाणे आचरण करून अशी पात्रता स्वत:मधे आणावी. ह्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नसले तरी अशी पात्रता अंगी येण्याचे प्रयत्न आपण नक्की करू शकतो.






Tuesday, August 27, 2019

new Marathi post on 27/08/2109
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com
For English Readers a separate post has been added.



दि. २७//२०१९
स्वर्गातून पाठविलेला अभंग ३ रा :-

उद्धरिले कूळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यात ॥ १ ॥
त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसें साधियेले साधन बरवे ॥२ ॥
बरवे साधन सुखशांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणें जळ गंगे चे तें॥ ४ ॥

अभंगाचा शब्दार्थ :-

ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे अशा पुरूषाचे हे वर्णन हा भंग तर करतोच ; त्याशिवाय त्याचे वागणे कसे असते? ते वर्णन हा अभंग सांगतो.
महाराज म्हणतात :-
ज्याची भगवंताची भेट झालेली असते त्याचा स्वत:चा उद्धार तर होतोच ; शिवाय त्याच्या कुळाचा उद्धार पण होतो. ॥ १ ॥ भगवदभेटीमुळे त्याचे सर्व त्रैलिक्याशी ऐक्य घडते व अर्थातच द्वैताचा संपूर्णपणे निरास होतो. त्यासाठी त्याने असा उद्धार होईल अशीसे साधना केलेली असते.॥२॥ ह्या केलेल्या साधनेमुळे त्याच्या मनाला शाश्वत सुख व शांतीचा अनुभव येतो.( द्वैतभाव नसल्यामुळे ) त्याल कोणावरच क्रोध येत नाही ॥३॥ त्याच्या मनास कोणत्याही मळाचा स्पर्श होत नाही . त्याचे मन गंगेच्या पाण्यासारखे शुद्ध असते.॥ ४ ॥

अभंगाचा अर्थ समजण्यासाठी लागणारी माहिती :-
स्वर्गातून पाठविलेल्या अभंगांमधील हा ३ रा अभंग आहे.

) महाराजांनी आपल्याला पहिल्या अभंगात जन्माची कारणे तसेच दु:ख भोगावे कां लागते हे सांगून ह्यातून सुटके साठी परमार्थ साधन करावे हे सांगितले आहे.

) त्यानंतर चित्तशुद्धीचे महत्व सांगणारा अभग दुसरा आपण पाहिलाच आहे. त्यामधे ब्रह्मज्ञानी सदगुरुंना शरण जावे हा उपदेश महाराजांनी केला आहे.

आता ह्या तिसऱ्या अभगामधे; तुकाराम महाराज आपल्याला तीन मुद्दे सांगताहेत ) ज्याची भगवंताशी भेट अर्थात आत्मज्ञान मिळाले आहे त्याला काय मिळाले.
) त्याच्या कुळाला काय लाभ होतो.
) अशा पुरूषाची मनस्थिती / अंतरंग कसे असते .
अध्यात्म शास्त्रांमधी अद्वैत वेदांता अत्यंत मुक्ती / मोक्ष ही कल्पना प्रथम स्पष्ट केली आहे.. त्यासाठी माणसाचा जन्म जीवाला मिळालेला आहे. जीव व शीव वस्तुत: एकच आहेत पण जीवाच्या मनावर असलेल्या मायेच्या आवरणामुळे तो स्वत:ला भगवंतापासून वेगळा समजतो. ह्या मायेच्याकरामतीमुळे त्याला अनेक जन्म घेऊन सतत सुख / दु:खे सोसावे लागतात. सुख तिळाएवढे भोगावे लागतात.”’ सुख पाहता जवा एवढे व दु: पर्वताएवढे " ह्याचरणांचा तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे.

मोक्षप्राप्ती म्हणजेच हा द्वैतभाव संपूर्णपणे नष्ट होणे होय. ही मनाची स्थिती तेंव्हाच येते जेंव्हा साधकाला मी व भगवंत वेगळे नाही हा अनुभव येतो त्यालाच भगवंताची भेट होणे म्हणत्तात. येथे भक्त व भगवंत यांचे ऐक्य झालेले असते. श्री. रामकृष्ण परमहंस दृश्टांत सांगताना म्हणतात की मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली व समुद्राशीच एकरूपता पावली. पूर्वी वेगळि होती, समुद्रभेटीनंतर समुद्ररूप झाली. असा ब्रह्मसाक्षात्कारी पुरूष असतो.


अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

अभंगाच्य़ा पहिल्याच चरणात तुकाराम महाराज म्हणतात की " उद्धरिले कूळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यात ॥१॥.अर्थात ज्याने अशी भगवंताची भॆट घेतली आहे ,अर्थात जो मुक्त झाला आहे त्याचा स्वत:चा उ्द्धार तर झालेलाच असतो, शिवाय त्याने ज्या कुळात जन्म घेतला आहे अशा त्याच्या कुळाचा पण उद्धार होतो.

उद्धार होणे म्हणजेच मोक्ष मिळणे. हे आपण जाणतोच. पण आपण जाणतो ते पुस्तकी ज्ञान होय. मोक्षप्राप्ती ही नरदेहातच मिळते. वेदांतात ॐकारातून सृष्टी निर्माण झाली हा एक सिद्ढांत आहे. त्यानुसार निराकार परब्रह्मामधे " एकोऽहं बहुस्याम " मी एकटा आहे व अनेक होईन " असा आदिसंकल्प निर्माण झाला. त्यालाच मूळमाया , भगवंत ही नांवे आहेत. त्यानंतर भगवंताने पंचभूते निर्माण केली. प्रत्येक शरीर हे पंचभूतांचेच बनलेले असे. नंतर भगवंताने स्वत:चाच अंश अनेक शरीरांमधे घालून ८४ लक्ष योनींचे प्राणीमात्र निर्माण केले. ह्याप्रमाणे प्रगट सृष्टि तयार झाली. ह्यातल्या फक्त मनुष्यप्राण्यालाच भगवंताची भॆट घेता येते . त्यासाठी काय प्रयत्न करावे हे समजते. हे प्रयत्न करणे म्हणजेच साधना करणे होय.
साधनेचे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. ) भक्तीमार्ग २) ज्ञान मार्ग ३) योग मार्ग. माणसाला आपण कोणता मार्ग निवडावा ह्याचे स्वातंत्र्य आहे.

मोक्षप्राप्त झालेल्या पुरूषाकडून अशी साधना घडलेली असते. त्याच्या कुळात असणाऱ्या व्यक्तींना ह्या साधनेचा सत्संगतीचा आपोआपच लाभ होतो. त्यांना पण आपण अशी साधना करून मोक्षप्राप्ती करून घेण्याची इच्छा होते. एका दिव्याने दुसरा लावतात तसेच कांहीसे हे होत असते. असा अर्थ घॆणे येथे स्पष्ट झाले. भगवंत सर्वव्यापी, जन्ममृत्यातीत आहे व भगवंताशी ऐक्य पावलेला पुरूष पण असाच सर्वव्यापी म्हणजेच " त्रैलोक्याशी एक होणे" होय.

अभंगाचा पुढचा चरण म्हणतो :- त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसें साधियेले साधन बरवे.अशी साधना करणे हेच सर्वोत्तम होय. ही साधनाच भगवंताची भेट घडविते म्हणुन " साधन बरवे " हे शब्द महाराजांनी योजले आहेत. अर्थात साधना करावी हेच आपल्याला ते एकप्रकारे सांगत आहे.
साधनेचा परिपाक म्हणजे मोक्षप्राप्ती. सर्व त्रैलोक्य व्यापलेल्या भगवंताशी ऐक्य अनुभवणे म्हणजेच आपण व ह्या सृष्टीतले सर्वकांही एकच आहोत ही जाणिव सतत जागृत असणे होय. ह्या जाणिवेमुळे सर्वच आपलीच आहेत हा सर्वसमभाव मनामधे सातत्याने असतो. ह्यालाच द्वैताचे निमणे अर्थात निरसन होणे म्हणतात. किंवा अद्वैत साधणे पण म्हणतात.
अशी व्यक्ती ह्या अद्वैतानुभवानंतर कशी जीवन जगत असते. ह्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की अशी व्यक्ती पुढचे सर्व जीवन लोकोद्धारासाठीच जगते. तेच वर्णण पुढचे चरण करतात.

अभंगाचे पुढचे चरण आहेत :- बरवे साधन सुखशांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३॥तीळभरी नाही चित्तासी तो मळ ।
त्यामुळे अशा संतव्यक्तीच्या मनामधे काम, क्रोध ईत्यादी षडरिपूंना स्थानच नसते. आपलाच म्हटले की प्रेमभाव हा आलाच. ह्या प्रेमभावामुळेच सर्व संतांनी उपदेशपर वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. तसेच श्रीमद्‌ भगवदगीता मधे पण ह्याच कारणाने अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगाला उपदेश केला आहे. गीता ही साक्षात भगवंताची वाणी आहे. सर्व संत गीतेचा संदर्भ म्हणुनच देतात. संतवाङयातील उपदेशाचा उद्देश एकच की मानवजातीने असे ऐक्य साधावे व जन्माचे सार्थक करून घ्यावे.

कारण जेंव्हा हे ऐक्य साधते तेंव्हाच मनाला एक शाश्वत अशी सुख व शांती मिळते. जीवाच्या मनामधे काम उतपन्न होतो. अभिलाषा निर्माण होतात. व कोणतीही अभिलाषा, जर पूर्ण झाली नाही की मनाची हॊणारी क्षुब्धता म्हणजे क्रोध ह्यामुळेच मन खरेतर अशांत होत असते. मुख्यत: अभिलाषा तीन प्रकारच्या असतात. त्यांनाच ईषणा असे पण म्हणतात. लोकेषणा, दारेषणा, वित्तेषणा.ह्या अभिलषाच मनाची शांती बिघडवतात. ह्यांचे असणे म्हणजे देहबुद्धी असणे होय. ज्याच्या मनामधे अशा अभिलाषांना स्थानच उरलेले नाही त्याला शाश्वत शांतीचाच येत असतो. ह्या अभिलाषा सर्व प्रथम चित्तमधे उत्पन्न होत असतात. म्हणून त्यांना तुकाराम महाराजांनी चित्ताचा मळ म्हटले आहे.

शेवटी महाराज म्हणताहेत की " तुका म्हणें जळ गंगे चे तें" अर्थात असे ज्याचे मन असते ते गंगेच्या निर्मळ जलाप्रमाणेच असते.
येथे हा अभंग पूर्ण झाला आहे.

अभंगाचे तात्पर्य :- आपले मन असे संपूर्णपणे निर्मळ जेंव्हा होईल तेंव्हाच भगवंताची भेट होईल . त्या साठीच आपले मन निर्मळ करण्यासाठीच आपण प्रयत्न म्हणजे साधना करायची असते हेच आपल्याला ह्या अभंगामुळे स्पष्ट झाले.




Wednesday, May 3, 2017

स्वर्गातून पाठविलेले अभंग : अभंग २ रा अहर्निशी सदा परमार्थ करावा।

स्वर्गातून पाठविलेले अभंग : अभंग २ रा अहर्निशी सदा परमार्थ करावा।
Blog address : http: // tukaramasteachings.blogsopt.com
Contact mail address is rgphadke@gmail.com

स्वर्गातून पाठविलेले अभंग :- अभंग रा.
विशेष टिप:- स्वर्गातून पाठविलेले अभंग ह्या साखळीतला हा दुसरा अभंग येथे विवरणासाठी घेतला आहे. हे अभंग खरेच कां महाराजांनी स्वर्गारोहणा नंतर पाठवले?  ह्यावर आपण कांहीच ठामपणे म्हणू शकत नाही. कदाचित तुकाराम महाराज सदेह स्वर्गास गेल्यानंतर त्यांच्या एखाद्या भक्ताने त्यांच्या हजारॊ अभंगाचे सारांश म्हणुन हे अभंग एकत्र केलेले असतील. वस्तुस्थिती कांही कां असेना आपल्याला हे १४ अभंग परमार्थ साधनेसाठी नक्कीच उपयोगी आहेत. ह्याच दृश्टीने आपण ह्या अभंगांकडे पहावे हेच उत्तम होईल.
कोणाचा स्वर
अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय ठेवावा आडमार्गी १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील त्यांतून काढील तोचि ज्ञानी २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी वेळोवेळां त्यासी शरण जावे
आपण तरेल नव्हें ते नवल कुळॆं उद्धरील सर्वांची ती
शरण गेलियानें काय होतें फळ तुका म्हणें कुळ उद्धरिले
अभंगाचा शब्दार्थ :-
माणसाने आडमार्गाला जाता रात्रंदिवस परमार्थ करावा ॥१॥ आडमार्गाला जे लोक जातात त्यांना त्यातून बाहेर काढतो तोच ज्ञानी होय. ॥२॥
असा (ज्ञानी मनुष्य) स्वत:चा उद्धार करून घेतो ह्यात कांहीच  नवल नाही , तो सर्वांची कुळे उद्धारितो ४॥ अशा खऱ्या ज्ञानी माणसाला वेळोवेळी शरण जावे तुका म्हणतो, अशा शरणागतीचे हेच फळ मिळते की सर्व कुळाचा उद्धार होतो .
अभंगाच्या अर्थस्पष्टीकरणासाठी आवश्य असलेली माहिती :--
अभंगांच्या ह्या साखळीतल्या आधीच्या ( १ल्या ) अभंगामधे तुकाराम महाराजांनी हाच उपदेश केला आहे की आपला हा नरजन्म दुर्मीळ आहे. परत मिळेलच ह्याची शाश्वती नाही . म्हणुन परमार्थ साधन करून स्वत:च्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे त्या साठी त्रिगुणातीत व्हावे हे पण सुचविले आहे.
आता ह्या दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराजांनी आणखी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
अभंगाच्या आरंभीच  तुकाराम महाराज सांगत आहेत की परमार्थ करण्यासाठी आडमार्गाला जाऊ नये.
हा आडमार्ग म्हजे काय हा प्रश्न येथे आपल्याला पडतो. आडमार्ग म्हणजे खरा देव कोण ? त्याचा माझा काय संबंध आहे ? माझे भले कशांत आहे ह्याचा विचार करता, पूजापाठ करणे, तीर्थयात्रा , दानधर्म ईत्यादी करणे. निरनिराळे नवस बोलणे देवाकडे अशाश्वताची मागणी करणे. ईत्यादी सर्व क्रिया मणजेच आडमार्गास जाणे म्हणता येते.
साधारणत: ही सर्व कर्मे केल्याने पुण्य मिळेल स्वर्गसुख मिळेल अशी भावना मनात असते. बरेच वेळा अशा लोकांना देवाकडून आपल्या निरनिराळ्या वासना त्याने पूर्ण कराव्या अशी अपेक्षा असते. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग हीच मंडळी देवाला नांवे सुद्धा ठेवायला मागेपुढे पहात नाहीत.
बरेच वेळा कांही माणसे जो कोणी चमत्कार दाखवतो अशा माणसाला साधू समजतात त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतात. पण बहुतेक वेळा आडातच नाही तर पोहोऱ्यात पाणी येत नाही तसे होते जन्म व्यर्थ जातो.
हे असे वर्तन असणे म्हणजेच आडमार्गावर जाणेच होय. श्रीमद.दासबोधामधे समर्थ रामदासांनी ह्यावर बरेच कांही लिहिले आहे. ते मुळातच वाचणे योग्य होईल. तेच येथे फक्त सारांशरुपाने स्पष्ट केले आहे.
आता परमार्थ म्हणजे काय हे पाह्णे योग्य ठरेल परमार्थ महणजे परन अर्थात उत्तम अर्थ म्हणजे फळ. साधारणत: माणसाला आपल्याला खूप संपत्ती मिळाली की सर्व सुखे मिळतील असे वातते त्यासाठीच तो भरपूर प्रयत्न करत असतो. पण ही संपत्ती अशाश्वत असल्यामुळे;  सतत टिकणारे म्हणजेच शाश्वत समाधान कधीच मिळत नाही.
ज्यांना शाश्वत समाधान मिळाले आहे अशी माणसे पण जगामधे आहेत  आढळतात. त्यांना आपण संत सज्जन म्हणतो. त्यांना मिळालेले हे शाश्वत सुख समाधान त्यांना ब्रह्मज्ञान  आत्मज्ञान झालेले असल्याने प्राप्त झालेले असते. संत तुकाराम, ष्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद ही अशी आत्मज्ञानी संत मंडळी होती.
असे आत्मज्ञान मिळाल्यावर जीवनातले सर्व दु: नामशेष होते. ह्यासाठी जे प्रयत्न करणे घडते त्यालाच परमार्थ साधन म्हणतात..
अभंगाच्या पहिल्या चरणामधे तुकाराम महाराज हाच उपदेश करताहेत की माणसाने रात्रंदिवस परमार्थसाधन करावे.
अभंगाच्या पुढच्या दुसऱ्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणताहेत की खरा ज्ञानी आडमार्गाने जाणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन करतो तो उपदेश करून त्यांना योग्य त्या मार्गावर नेतो.
महाराज  पुढच्या तिसऱ्या व पुन्हा एकदा ५व्या चरणात हे पण स्पष्ट करतात की अशा ज्ञानी मानसाने स्वत:च्गा उद्धार अर्थात स्वत:च्या जीवनाचे सार्थ करून घेतलेले असते. म्हणून त्यालाच वेळॊवेळी शरण जावे.
येथे वेळोवेळी हा शब्द हेच सांगतो की आत्मज्ञान कांही एकदम मिळत नाही. ते मिळवण्याचे प्रयत्न करताना चुका होतातच ज्या ज्या वेळि अशी चूक आपल्या कडून होते त्या त्या वेळि संतांना शरण जावे.संतांना  म्हणजेच ज्ञानी पुरुषालाच कां शरण जावे? ह्याचे उत्तर हेच आहे की फक्त त्यांनाच आत्मज्ञान झालेले असते . उदाहरणार्थ ज्रर आपल्याला हिंदुस्थानी गाण्याचे ज्ञान हवे असेल तर ज्याला हे ज्ञान आहे तोच ते आपल्याला शिकवू शकतो.गणीताचे ज्ञान गणित ज्याला येते तोच शिकवू शकतो.

पण संत किंवा ज्ञानी पुरूषाला ओळखायचे तरी कसे? हा प्रश्न तरीही आपल्याला पडतोच. जर आपण समजतो तो खरा ज्ञानी नसला तर फसगत होऊन आपण आडमार्गालाच जाण्याची शक्यता आहे. ह्यावरचा उपाय म्हणजे संतांचे ग्रंथ वाचणे. संत अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष हा परब्र्ह्माशी अद्वैत साधलेलाच असतो. त्याचे शब्द ही परमेश्वरी वाणीच असते. अर्थात त्यांच्या ग्रंथात असलेली वाणी/ उपदेश हा त्यांचेच शब्दरूप असते. आपल्यासारख्यांचा उद्धार व्हावा म्हणुन त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत.
वर लिहिलेल्याला आधार म्हणून आपल्याला संतांची चरित्रे पाहता येतात. उदाहरणार्थ समर्थ रामदासांचे चरित्रातला खालील प्रसंग बोलका आहे.
समर्थ रामदासंनी देहत्याग कधी करावा असे विचारल्यावर त्यांचा परमशिष्य उद्धव म्हणाला की माघ कृष्ण नवमीचा दिवस साधावा, समर्थांनी त्याला शाबासकी पण दिली. पण ईतर शिष्य दु:खी झाले. त्यांना समजावताना समर्थ म्हणाले की.
माझी काया गेली खरे , परि मी आहे जगदाकारे ऐका स्वहित उत्तरें। सांगेन  ती नका करू खटपट। पहा माझा ग्रंथ नीट। तेणॆ सायुज्याची वाट ठायी पडे राहा देहाच्या विसरे वर्तू नका वाईट बरे। तेणॆं मुक्तीची द्वारे चोजविती
आत्माराम दासबोध माझे स्वरूप प्रसिद्ध असता करावा खेद। भक्तजनी
हेच ईतर संतांच्या ग्रंथांबद्दल म्हणता येते. अर्थात संतांचे ग्रंथ वाचन, त्यावर मनन त्या प्रमाणे आचरण करणे हे संतसंगतीत राहणे , त्यांना शरण जाणेच होय.
अर्थात जेंव्हा आपण असे वागायला लागतो तेंव्हा अंत:करण सहजच शुद्ध होत जाते. ह्या शुद्ध अंत:करणातच भक्तीचा झरा उमटतो व वाहू लागतो .
असे म्हणतात की ज्याला आत्मज्ञान होते त्यामुळे त्याच्या २४ पिढ्यांचा उद्धर होतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी अभंगाच्या ५ व्या चरणाच्या शेवटी असे म्हटले आहे की माणसाने स्वत:च्या कुळाचा उद्धर करून घ्यावा. हा अभंगाचा ५ वा चरण आपणा सर्वांना केलेला उपदेशच आहे.

अभंगाची शिकवण:-  अभंगाची शिकवण हीच आहे  की सत्संगत धरावी व स्वत:चाच नाही तर आपल्या सर्व कुळाचा उद्धर करून घ्यावा.